पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लीम समाजमनाला लेखणीत पकडणारा कथासंग्रह
मुस्लीम समाज आजच्या भयानक वर्तमानात किती कशी अस्वस्थता अनुभवतोय. दुय्यम वागणुकीची खेळी कुठल्याही विचार प्रणालीतून, छावणीतून पद्धतशीर पसरवली जातेय, त्याचा कहर होतोय. मात्र याला तितक्याच संयतपणे, आकांडतांडव न करता जसं जमेल तसं आतून उसवून हा लेखक आपली प्रातिनिधिक अस्वस्थता मांडत राहतो, तीही सविनय. त्याचा प्रत्यय हा कथासंग्रह देतो आणि ही सविनय अस्वस्थताच आपल्याला एकसंध ठेवते.......